Update:   IST       वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  लॉग-इन  |  Bookmark

पाकने चर्चेसाठी पुढे यावे - पंतप्रधान
पीटीआय
Tuesday, November 24, 2009 AT 02:19 AM (IST)
वॉशिंग्टन - पाकिस्तानने भारताबरोबर नव्याने बोलणी करण्यास पुढे यावे, असे अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या बरोबर डॉ. सिंग यांची शिखर परिषद होत आहे. परिषदेच्या पूर्वसंध्येला डॉ. सिंग यांनी मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्याचीही आठवण करून दिली.

परराष्ट्र मंडळात बोलताना पंतप्रधानांनी भारत आणि अमेरिकेत विविध वस्तू, सेवांसाठी खुली अर्थव्यवस्था मजबूत व्हायला हवी, असे सांगितले.
भारत-पाकिस्तान संबंधाबद्दल ते म्हणाले, भारताला आशिया खंडात शांतता हवी आहे. भारताने पाकबरोबर संबंध सुधारण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले. परंतु, पाककडून तेवढा प्रतिसाद मिळू शकला नाही. पाकिस्तानने आता बदलायला हवे. दोन्ही देशातील नागरिकांना शांततेने जीवन जगता यावे, अशी भारताची अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया
On 3/2/2010 6:07 PM महेश कुलकर्णी डोंबिवली, said:
चर्चा करून काय उपयोग ,येरे माझ्या मागल्या, महेश कुलकर्णी डोंबिवली,
On 11/29/2009 3:43 PM madhavrao bajirao patil said:
Foriegn affairs is not related to political parties.So dont try to say to regarding eny kind of foriegn related events are occurred due to any political parties governance in India.We should learn to behave well with neighbours.our neighbours are not willing to behave well,so only diplomacy can work on such type of issue,and dipomacy ask more time to solve problems.Now there is a need of lot off patience by indians at present.
On 24/11/2009 19:20 Aditya said:
अरे बस झाले अमेरिकेचे कुओतुक, या कॉंग्रेस चा सरकार चा काही उपयोग नाही. आपले हे सरकार कधी गुलामगिरीतून बाहेर येणार. आधी केली ब्रिटीश लोकांची गुलामगिरी. आता अमेरिकेची. आपल्या पंतप्रधांनाना अमेरिकेत जायची काय गरज आहे. तो ओबामा चीन चा दौरा करतो. & आपण त्या अमेरिकेचा मागे लागतो. अरे काही स्वाभिमान आहे कि नाही ...
On 11/24/2009 6:16 PM SHIVRAM GOPAL VAIDYA said:
..देशाची संपत्ती लुटून, आपल्या कित्येक भावी पिढ्यांची सोय करून ठेवतील. मंत्री भ्रष्टाचाराचे नवे रेकॉर्ड करतील, सत्ता टिकवण्यातच नेते मग्न राहतील, हे असेच चालणार आहे.
On 11/24/2009 6:09 PM maitreya said:
युद्ध करायला फक्त हिम्मतच लागते असे नाही. समजा युद्ध झालेच आणि आपण ते जिंकले तरी त्यानंतर झालेला विध्वंस कसा आवरायचा? राष्ट्राची पुनर्बांधणी करणे सोपे नसते. आणि त्या पुनर्बांधणीचा अनुभव तरी गेली कित्येक दशके भ्रष्टाचारात रमलेल्या ह्या राजकारण्याना आहे का? साधा एक उड्डाणपूल किंवा रस्ता बनवायचा तरी दशके लागतात. त्यापेक्षा " चलता हे " नीती ह्यांना परवडते.
On 11/24/2009 3:04 PM anand said:
कॉंग्रेस च्या राज्यात हे असेच चालणार ....
On 11/24/2009 1:36 PM aamchi pratikriya said:
हे कधी संपणार. त्यांनी स्पोट घडवायचे, आम्ही फक्त निषेध करून बंदी घालायची. त्यांच्यात मात्र काही सुधारणा नाही. मग आम्हालाच खाज येते अन हि असली चर्चेची आमंत्रणे दिली जातात. शांततेचा पर्याय सगळ्याच ठिकाणी उपयोगी पडत नाही. पण कॉंग्रेस च्या राज्यात काय अपेक्षा करणार.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: