Update: 
      वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  लॉग-इन  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font

भारतीय विद्यार्थ्यांवर ब्रिटनमध्ये बेरोजगारीची कुऱ्हाड
सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 03, 2009 AT 12:00 AM (IST)

लंडन - "कमवा आणि शिका' योजनेद्वारा भारतातील खेड्यापाड्यातील शेकडो गरीब विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविले जात आहे. गेल्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रातही क्रांती झाली. भारतीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी झेप घेतली. तेथे शिक्षण घेताना अर्ध वेळ नोकरी मिळत असे. आता मात्र चित्र काहीसे बदलले आहे. ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या हाताला काम नसल्याने, अनेक विद्यार्थी मातृभूमीकडे परतत असल्याचे चित्र आहे.

"कमवा व शिका' सूत्राच्या आधारे उच्च शिक्षण पूर्ण करू पाहणाऱ्या ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ज्यांचे पालक शिक्षणाचा खर्च देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना तेथे भाड्याने घर घेणे व खाणावळ लावणेही अवघड होऊन बसले आहे. काही विद्यार्थ्यांनी साऊथहॉल येथील गुरुद्वाराचा आश्रय घेतला आहे. तेथे जेवण मोफत असल्याने व काही दिवस राहण्याची व्यवस्था होत असल्याने, विद्यार्थ्यांचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटतो. भारतीय विद्यार्थ्यांच्या समस्येवर "बीबीसी'ने प्रकाशझोत टाकला आहे. नितीन वालिया या विद्यार्थ्यांने सांगितले, की त्याने भाड्याने खोली घेण्याचा प्रयत्नच केला नाही. बसप्रवासासाठी नातेवाइकांकडून तो पैसे उसने घेतो. खर्च भागविण्यासाठी त्याला नोकरी करणे भाग आहे. श्री गुरुसिंग सभेचे अध्यक्ष दीदारसिंग रंधवा म्हणाले, ""आज शेकडो भारतीय विद्यार्थ्यांना आम्ही दररोज अन्न देतो; मात्र, विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करू शकत नाही. आमची संस्था त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहते. त्यांच्या रोजगारासाठी "हेल्पलाइन' सुरू केली असून, नोकरीसाठी कुठे अर्ज करावयाचा, याचे मार्गदर्शनही करण्यात येते.''
व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या रवी सिंग याने सांगितले, की परदेशात आम्हाला पाठविताना भारतातील एजंट मंडळी येथे नोकरीचे आश्‍वासन देतात; परंतु, येथील वास्तव तसे नाही. आमची फसवणूक झाल्याचे येथे आल्यावर कळते. दरम्यान, "गड्या आपला देश बरा' म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
On 12/02/2010 06:58 nishi said:
खरच ब्रिटन मध्ये खूप प्रमाणात भारतीय पाकिस्तानी आणि बांगलादेशी विद्यार्थी आहेत आज काल जॉब ची बोंब आहे आपल्या भारतातून गुजराती विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत अगदी ज्यांना इंग्रजी चा इ सुद्धा कळत नाही इथे येऊन मग ती लोक बेकायदा काम करण्याचे उपद्व्याप करत आहेत तसे इथे इतर भारतीय सुद्धा आहेत त्यातल्या त्यात मराठी माणूस अशा बेकायदा गोष्टीत खूपच कमी आहे उद्या जर अशा बेकायदा काम करणाऱ्या लोकांमुळे भारतीयावर हल्ले झाले तर नवल वाटायला नको
On 12/3/2009 11:44 AM abhu said:
pardeshi शिक्षणा साठी जाण्या चे आधी सर्व गोष्टींचा विचार करा, मुक्या पैसे ची व्यवस्था काय आणि कसे उभारणार. तरच या नाहीतर भारत चांगल अआहे.
On 3/12/2009 1:24 AM Ajit Kajale, Australia said:
भारतातील एजंट मंडळी स्वताचा फायदा बघतात आणि मूर्ख लोक त्यांना मिळतात.........मी लोकांना योग्य माहित देत होतो पण विग्नासंतोशी एजंटनी अडचणी आणल्या................ लोकांनी स्वत माहिती काढली तर त्यांचाच फायदा होईल..........मी स्वत एजंट होतो पण लोकांना फसवले नाही म्हणून धंदा बंद करून घरी बसलो आहे पण शांत पणे झोपू शकतो.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: