Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पुनर्जन्माचे मनोरंजन
-
Friday, February 05, 2010 AT 08:28 PM (IST)
Tags: entertainment,   tv

(पुरुषोत्तम आबुज)
 
सध्या एका दूरदर्शन वाहिनीवर पुनर्जन्मावर आधारित एक "मनोरंजनाचा' कार्यक्रम दाखवला जातो. पुनर्जन्म या विषयावर कुणाचा विश्‍वास असो अगर नसो; परंतु या कार्यक्रमातील गोष्टी नक्कीच अविश्‍वसनीय आहेत.
 
या कार्यक्रमात सहभागी झालेले जाणून घेतात की पूर्वजन्मी ते कोण होते, त्यांचा मृत्यू कसा झाला, वगैरे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ही माहिती अत्यंत तपशीलवार असून, कार्यक्रमाची संचालिका सदर व्यक्तीस पूर्वजन्माचे कुठले वर्ष त्यास आठवत आहे, ते वाळूवर बोटाने रेखाटण्यास सांगते. मला तर कुमार गंधर्वाच्या "ऋणानुबंधाच्या...' गीतातील ".... वाळूत मारल्या रेघा' याची आठवण होते.
 
असो, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका व्यक्तीने त्याचे पूर्वाजन्माचे वर्ष १५१४ असे रेखाटले. १५१४ मध्ये राजस्थानातील एका गावात त्याचा मृत्यू झाल्याचे त्याला आठवले. १५१४ हे इंग्रजी कॅलेंडरमधील वर्ष त्यास आठवले खरे; पण ही इंग्रजी कालमान पद्धत घेऊन इंग्रज त्यानंतर शेकडो वर्षांनी भारतात आले. मग त्याला आधीच १५१४  हे इंग्रजी कॅलेंडरमधील वर्ष कसे आठवले कोण जाणे! कदाचित राजस्थानच्या या जन्माआधीचा त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असावा आणि इंग्रजी कालमान पद्धत त्याने न चुकता आठवणीत ठेवली असावी.
 
पुनर्जन्म ही संकल्पना जर खरी असेल तर लोकसंख्येत बेसुमार वाढ का होत आहे, हे मला कधीच कळले नाही. पुनर्जन्मावर जर असे कार्यक्रम दाखवण्यात आले, तर जीवन संपले तरी पुढे आपल्याला परत जन्म मिळेल असा ग्रह धरून आत्महत्येचे प्रमाण वाढणार नाही का? आपल्या प्रसारमाध्यमांकडे जर शिल्लक वेळ असेल तर त्यांनी लोकांचे पूर्वजन्म आणि भविष्य जाणून घेण्याचा खटाटोप करण्यापेक्षा काही वेळ त्यांच्यासाठी खर्च करावा, ज्यांचे वर्तमान जीवन असह्य झाले आहे.
प्रतिक्रिया
On 2/26/2010 5:23 PM Sagar said:
एकदा काही संशोधकांनी शोध लावला कि माश्या या लाल रंगाकडे आकर्षित होतात. ठीक आहे पुढे काय. त्यंच्या संशोधनाचा माश्या ( किंवा डास) नष्ट करण्यास उपयोग झाला का? काही लोक so called अमेरिकन संशोधकांच्या नावावर काहीपण खपवतात. शोधायला गेले तर त्या नावाचे संशोधक, विद्यापीठ किंवा प्रयोगशाळा काहीच सापडणार नाही .....
On 24/02/2010 15:38 Vinayak said:
हयातल्या एका एपिसोड मध्ये त्या माणसाने पूर्व जन्मी संसारिक जीवनाला कंटाळून जीव दिला. तरी गाढद्याने ह्या जन्मी परत लग्न केले. काय उपयोग परत जन्माला येऊन.पुढच्या जन्मी पण बायको च्या हातून मारणार हा.
On 2/13/2010 4:19 AM sambhaji said:
नशीब आपल कि ह्या मालिकेत एखादा असा माणूस आला नाही कि जो म्हणाला मी मागच्या जन्मी महात्मा गांधी होतो .लाज वाटायला पाहिजे अश्या मालिका दाखवायला यामुळे तरुण पिढीवर किती वाईट परिणाम होईल
On 2/12/2010 11:24 PM Kaustubh Devasthali said:
हा केवळ मूर्खपणा आहे. असले कार्यक्रम टी.आर. पी. वाढवण्यासाठी आहेत.
On 2/11/2010 6:22 PM gagabhatt@gmail.com said:
लोक बकवास आहेत. दूरचित्रवाणी मालिका त्याहून बकवास.... सर्वात बकवास शाहरुख खानाचा "ओम शांती ओम" टुक्कार, क श्रेणी..... "माय नेम इज..." सारखा!
On 11/02/2010 07:40 mic said:
Bakwas
On 2/10/2010 7:32 PM vrushali said:
पुनर्जन्मात काय घडले ते दाखवण्या पेक्षा भविषयात काय घडेल ते दाखविले तर आयुशा अजून सोपे जाईल
On 2/10/2010 7:00 AM Amit said:
कोणत्या वर्तकाने काहीतरी लिहिले आणि कोणत्यातरी अमेरिकन संशोदाकांनी रेफेरेन्सिस लिहिले म्हणून काही सिद्ध होत नाही. अशी हजारो पुस्तके बाजारात मिळतात. असले कोणतेही प्रोग्राम्स दाखवू नयेत. अनुप याने आपला वेळ चांगल्या कार्यात व्यतीत करावा.
On 2/9/2010 3:56 PM pravin modak said:
होय पुनर्जन्म आहे
On 2/8/2010 9:44 PM manisha said:
हे barobar aahe yala योग म्हन्तात्त
On 2/8/2010 6:03 PM K Harish said:
This is not a work of fiction. The evidences have proved that there is sustance in past life and anybody can experience this.Such programs can throw light on these kind of phenomenon. Its a proven thing by research.I like the program and also its a social welfare as it is healing people's chronicle problems.
On 2/8/2010 5:59 PM Mandar Kulkarni said:
पुनर्जन्म हे एक शास्वत सत्य आहे. भागवत गीतेचा अभ्यास करावा. परंतु असले कार्यक्रम समाजासाठी उपयोगी नाहीत उलट घातकच आहेत.
On 2/8/2010 5:46 PM K Harish said:
This is not a work of fiction. The evidences have proved that there is sustance in past life and anybody can experience this.Such programs can throw light on these kind of phenomenon. Its a proven thing by research.I like the program and also its a social welfare as it is healing people's chronicle problems.
On 2/8/2010 2:21 PM Sameer Bhate said:
शेवटच्या ओळी सुंदर आहेत. हे सगळे प्रकार त्या असंभव मालिके पासून चालू झाले आहेत. सगळ्या गोष्टींना दूरचित्रवाणी जबाबदार आहे. प्रत्येकाने आपण काय पहायचे आणि आपल्या मुलांना काय पाहायला लावायचे ह्याच्यावर जास्त विचार केला पाहिजे. असेल कदाचित अनुप म्हणतो तसे सत्य, पण आपण ह्या गोष्टी मुलांपासून दृस्तीआड केल्या पाहिजेत.
On 2/8/2010 10:34 AM Mahesh said:
असे प्रोग्राम दाखून TRP मिळवायची आहे त्यांना पण आम्ही मूर्ख नाहीत.त्या होस्टला तरी माहिती आहे का कि ती काय होती गेल्या जन्मी.मूर्खपणा झालाय आता हे मालिका म्हणजे.....
On 2/8/2010 9:38 AM swati kiran patil said:
टी.आर. पी. वाढवण्याची काम आहेत दुसरे काय
On 07/02/2010 13:00 Anup said:
ज्यांना ज्यांना पुनर्जन्म हि अंधश्रद्धा वाटत असेल त्यांनी Dr. P V Vartakanche पुनर्जन्म हे पुस्तक वाचावे तसेच त्याच्यात दिलेले इतर अमेरिकन संशोधकांचे रेफेरेन्सिस पण पडताळून बघावे......मुळात काहीहि माहित नसताना व काहीही वाचले नसताना ती केवळ अंधश्रद्धा असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. पुनर्जन्म आता scientifically proove करता येऊ शकतो.....आणि त्यासाठी scientific mansani त्यावर अधिक संशोधन करायला हवे.. पण माझा ह्या असल्या कार्यक्रमाना सुधा पूर्ण विरोध आहे....
On 2/7/2010 11:57 AM Gajanan Mane said:
हा केवळ मूर्खपणाच यावर जास्त काय बोलायचे
On 2/6/2010 3:56 PM neha said:
मूर्खपणा आहे झाला. लोक तरी अशा मालिका कशा काय चालू देतात?
On 2/6/2010 12:40 PM Sujata said:
पुनर्जन्म ही एक अंधश्रद्धा आहे.
On 2/5/2010 11:49 PM Vinayak said:
शेवटच्या दोन ओळी फार छान आहेत.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: