Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

कॉल सेंटरच्या दोन व्यवस्थापकांना अटक
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 09, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: call center,   crime,   mumbai

वाशी - मूळ वेतनापेक्षा कमी पगार देणे, महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ करून त्यांची पिळवणूक करणे, कामावर हजर असताना अनेकदा गैरहजेरी लावणे आदी प्रकारे कामगारांची तीन ते चार महिन्यांपासून पावणे एमआयडीसीतील एका कॉल सेंटरमध्ये पिळवणूक होत असे. याविरोधात कामगारांनी आज सकाळी येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन तुर्भे पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी कॉल सेंटरच्या दोन व्यवस्थापकांना अटक केली आहे.

एमआयडीसी येथील "आर टेक सिस्टीम' असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीत 350 ते 400 महिला-पुरुष काम करतात. या कंपनीतील काही अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ केला जात असे. तसेच कर्मचाऱ्यांना तीन ते चार महिने उशिराने पगार दिला जात असे, अशी महिला कामगारांची तक्रार आहे.

व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून महिला कर्मचाऱ्यांनी आज सकाळी येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी पावणे येथील आर. टेक कॉल सेंटरवर धडक दिली. अखेर व्यवस्थापनाने कामगारांना सर्व सुविधा देण्याचे कामगारांसमक्ष मान्य केले. कामगारांना अचानक कामावरून काढून टाकणे, गैरहजेरी लावणे, गैरहजर राहिल्यास एका दिवसाचे 700 रुपये कापून घेणे आदी प्रकार व्यवस्थापनाने केल्याची तक्रार कामगारांनी तुर्भे पोलिस ठाण्यात केली. त्यानुसार पोलिसांनी कंपनीचे व्यवस्थापक रविप्रसाद व अनिलकुमार या दोघांना आज अटक केली. दरम्यान, या दोघांना येथील काही कामगारांनीही मारहाण केली आहे.
प्रतिक्रिया
On 5/6/2010 7:14 AM abhijit said:
cal centers मध्ये यात हि राजकारण आल आहे का ......जय राजकारण !!!! जय महाकारण !!!!
On 4/22/2010 3:41 PM d v kadam said:
दोन्ही अधिकारी northche आहेत माणसे किती बय्याना वठणीवर आणणार
On 4/20/2010 12:07 PM Jay said:
विचार न करता मूर्ख सारख्या कॉमेंट्स देऊ नका , call center बंद केले तर तिथल्या कर्मचाऱ्यांनी खायचे काय??
On 4/20/2010 10:37 AM kundan said:
चांगले केले मनसे ने
On 4/18/2010 6:17 PM usharani said:
call सेंटर हि काळाची गरज आहे.अल्पशिक्षित स्त्री आणि पुरुषांसाठी कमाईचे साधन आहे. हायस्कूल टीचरपेक्षा येथील कर्मचारी जास्त वेतन घेतात.रात्रपाळी करावीच लागते.जोपर्यंत पाश्चिमात्य राष्ट्रांना येथील सेवा परवडते तोपर्यंत call सेन्टर्स चालू राहतील.
On 4/16/2010 5:36 PM Sushil said:
call centers सर्व ताबडतोब बंद करायला हवेत.
On 3/31/2010 12:40 AM Shyam pawar said:
थोतांड ...मग तू जाऊन बघ न धीरज तिथे खरच घडलं आहे का नाही ते...
On 3/20/2010 4:46 PM Dhiraj said:
मनसेचा आणखीन एक थोतांड
On 10/03/2010 12:31 man se said:
MANSE Zindabad !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: