केंद्र सरकारने बीटी वांग्याला परवानगी नाकारली
पीटीआय
Tuesday, February 09, 2010 AT 05:24 PM (IST)
नवी दिल्ली - बीटी वांगी बाजारात येण्यापूर्वी त्याची स्वतंत्र चाचणी घेतल्याशिवाय केंद्र सरकारकडून या वांग्याला परवानगी देण्यात येणार नसल्याचे, केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी आज (मंगळवार) सांगितले.
रमेश म्हणाले, "बीटी वांग्याचा संबंध अन्नपदार्थाशी व वातावरणाशी निगडीत असल्याने त्याच्यावर विचार होणे आवश्यक आहे. या वांग्यांवर अधिक अभ्यासाची गरज असून, तज्ज्ञांची मते जाणूनच पुढील निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत बीटी वांग्याला परवानगी देण्यात येणार नाही. देशातील अकरा राज्यांमध्ये बीटीपासून बनविलेल्या भाज्या खाल्या जात आहेत.