Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'प्रकटली श्री ज्ञानेश्‍वरी' हा सोप्या मराठीतील साक्षात्कार
सकाळ वृत्तसेवा
Sunday, March 07, 2010 AT 12:16 AM (IST)
पुणे -  'प्रकटली श्री ज्ञानेश्‍वरी' हा ग्रंथ नव्या पिढीसाठी सोप्या मराठीतील ज्ञानाचा साक्षात्कार आहे, असे प्रतिपादन "सकाळ'चे संपादक सुरेशचंद्र पाध्ये यांनी शनिवारी येथे केले.
स्वामी उमानंद सरस्वती सिद्ध योग आश्रम ट्रस्टतर्फे स्वामी राधिका आनंद यांनी लिहिलेल्या "प्रकटली श्री ज्ञानेश्‍वरी' या नव्या स्वरूपातील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कर्वेनगरमधील प्रतिज्ञा मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून पाध्ये बोलत होते.

स्वामी राधिका आनंद या सेतू माधवराव पगडी यांच्या घराण्याच्या परंपरेतील वारसा चालवीत असल्याने त्यांनी ग्रंथात केलेले वर्णन सुबोध, सोप्या भाषेतील असून रसाळ भावार्थ ओथंबून वाहात आहे. त्यामुळे एकतरी ओवी अनुभवावी या उक्तीचे प्रत्यंतर येत असल्याचे पाध्ये यांनी सांगितले.

ते म्हणाले, ""वाढलेला भ्रष्टाचार, गळेकापू स्पर्धा यामुळे भगवद्‌गीता आणि ज्ञानेश्‍वरीतील विचार कोमात गेल्यासारखी स्थिती असताना प्रकाशित झालेल्या या ग्रंथामुळे नवीन दिशा देणारा प्रकाशकिरण निर्माण होईल.''

स्वामी राधिका आनंद यांनी या वेळी "प्रकटली श्री ज्ञानेश्‍वरी' लिहिताना आलेल्या अनुभवांचे कथन केले. त्या म्हणाल्या, ""मराठीतील या ग्रंथासाठी अनेक संतांच्या विचारांचे मला मार्गदर्शन लाभले. त्यामुळे अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळाली. कलियुगातील अंधार दूर करून सत्‌युगाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी ज्ञानेश्‍वरीतील विचार उपयुक्त असून बुद्धीला चालना देणारे आहेत.''

नागपूर येथील ऍड. किशोर कांत, श्री. गोवारीकर, डॉ. शुक्‍ला आदींची या वेळी भाषणे झाली. अमिता मुळे आणि कांचन कांडगे यांनी सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया
On 3/8/2010 1:18 AM Radhika Jagtap said:
मृण्मय इंद्रियांना चिन्मय अनुभवामृत देणार्‍या श्री ज्ञानदेवांचा 'अमृतानुभव' हा आकाराने लहान परंतू अद्वितीय ग्रंथ. निखळ आत्मानुभवाला ऐहिक जीवनातील कुठलीच उपाधी शोभत नाही.
On 3/7/2010 10:37 PM raj said:
विचार कधी कोम्यात जात नाहीत , माणूस विचारहीन झाल्यावर तो जाणूनबुजून कोम्यात भ्रष्ट वागतो , आज ८०० वर्ष ज्ञानेश्वारीला आणि ५००० पेक्षा जास्त वर्ष गीतेला झाली , पण आजही ते विचार ज्ञान प्रत्येकाला उपयोगी आहेच , प्रश्न हा आहे कि आम्हाला ते मान्य आहे का ? लागू सारखे प्रतिभावान लोक डॉक्टर कि सोडून रंग फसतात आणि समाजाला आपली त्या विषयात लायकी नसताना देव नाही व ती कल्पना आहे असे सांगतात तेव्हा "भगवद्‌गीता आणि ज्ञानेश्‍वरीतील विचार कोमात गेल्यासारखी स्थिती " जास्त वाढते ,


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: