Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

ममता संतापल्या; कॉंग्रेस धास्तावली
सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, March 11, 2010 AT 12:15 AM (IST)
नवी दिल्ली - महिला आरक्षण विधेयकाचा राज्यसभेत ऐतिहासिक विजय झाल्यानंतर दिल्लीतील राजकारणाने बुधवारी वेगळेच वळण घेतले. आरक्षण विधेयकात मुस्लिम कोटा नसल्याबद्दल रेल्वेमंत्री ममता बॅनर्जींनी संतापून राजीनाम्याची धमकी दिली, तर यादवांच्या त्रिकुटाने आपली भूमिका अधिक आक्रमक करीत हे विधेयक लोकसभेत चर्चेसाठी येऊच नये, यासाठी राजकीय व्युहरचना सुरू केली आहे. यात ते भारतीय जनता पक्षातील ओबीसी खासदारांच्या गटाची मदत घेण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे विधेयकाच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या कॉंग्रेसच्या "चाणाक्‍यां'वर आता आस्तेकदम जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

राज्यसभेत विधेयक मंजुरीनंतर लोकसभेत ते येऊ नये, यासाठी यादव नेत्यांनी कंबर कसली आहे. या संदर्भात लालूप्रसाद आणि मुलायमसिंह यादव राष्ट्रपतींना भेटणार आहेत. या भेटीदरम्यान ते सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचे पत्रही सादर करण्याची शक्‍यता आहे. शिवाय, या आरक्षणाला भाजपमधील काही ओबीसी खासदारांनी विरोध केला असून, प्रसंगी पक्षाचा अध्यादेशही झुगारण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे यादव नेत्यांनी सरकारचा पाठिंबा मागे घेण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्यासमवेत भाजपमधील नाराज खासदारांची वेगळी मोट बांधली जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. लोकसभेतील संख्याबळात काही बदल झाल्यास सरकार धोक्‍यात येण्याची शक्‍यता असल्याने कॉंग्रेस नेत्यांनी आस्ते कदम जाण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे ज्या घाईने राज्यसभेत विधेयक मंजूर झाले, तेवढ्या घाईने ते लोकसभेत येण्याची शक्‍यता दुरावली आहे. मित्रपक्षांना अधिक नाराज न करता वित्तीय कामकाज आटोपण्यावर सरकारचा भर राहील. त्यामुळे अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात हे विधेयक लोकसभेत येऊ शकते.

राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी कॉंग्रेसने भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः डाव्या पक्षांशी केलेली हातमिळवणी, सर्वपक्षीय चर्चा करण्याचे पंतप्रधानांनी दिलेले आश्‍वासन न पाळणे आणि विधेयक मंजूर करताना खासदारांना बाहेर काढण्यासाठी मार्शलचा झालेला वापर यामुळे ममतांनी रेल्वेमंत्रिपद तुम्हीच सांभाळा, अशी धमकी कॉंग्रेसला दिली आहे. त्यामुळे सरकारमधील काही मंत्री आज ममतांची समजूत घालण्याच्या मोहिमेवर होते. त्या आपल्या निर्णयाचा फेरविचार करतील, अशी अपेक्षा पक्षाने व्यक्त केली आहे.

आरक्षण विधेयकात मुस्लिम महिलांना योग्य स्थान नसल्याचा बॅनर्जींचा आक्षेप आहे. त्यामुळे लालू, मुलायम, शरद यादव यांच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा होता. या संदर्भात सर्वपक्षीय चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे आश्‍वासन पंतप्रधानांनी दिले होते. मात्र, विधेयक मंजूर करण्यासाठी कॉंग्रेसने भाजप आणि डाव्या पक्षांची मदत घेऊन अपेक्षित मतदान घडवून आणले. त्याला विरोध करणाऱ्या सात खासदारांना बाहेर काढण्यासाठी मार्शलची मदत घेतली. याबद्दल बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली. पश्‍चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ममता यांना डाव्या पक्षांशी अप्रत्यक्षपणे का असेना, सोबत नको आहे. शिवाय, राज्यातील 27 ते 30 टक्के मुस्लिम मतदारांची नाराजी न परवडणारी असल्यामुळे ममतांनी ही टोकाची भूमिका घेतली आहे.

राज्यसभेत मतदानाच्या वेळी तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी अनुपस्थित राहून नाराजी दाखवून दिली. परंतु, लोकसभेत 19 खासदारांचे बळ असलेला तृणमूल कॉंग्रेस हा
सरकारमधील कॉंग्रेसनंतरचा दुसरा सर्वांत मोठा घटक पक्ष आहे. त्यामुळे ममतांच्या इशाऱ्यानंतर सरकारच्या गोटात धावपळ उडाली. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते जरी शांत असले, तरी वाणिज्यमंत्री आनंद शर्मा, वनराज्यमंत्री जयराम रमेश आणि इतर काही राज्यमंत्र्यांनी ममतांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ममतांनी आपल्याला विधेयक मंजुरीत कोणत्याही प्रकारे विश्‍वासात घेतले नसल्याबद्दल आणि "माकप'शी केलेली हातमिळवणी मान्यच नसल्याचे या मंत्र्यांना सुनावल्याचे समजते.
महिला आरक्षण विधेयकातील सध्याच्या तरतुदींना मुस्लिमांचा विरोध आहे. शिवाय विरोधामुळे निलंबित झालेल्या सात खासदारांपैकी चार मुस्लिम आहेत. त्यामुळे विधेयकात आरक्षणाबद्दल फेरविचार व्हायला हवा. तसे न झाल्यास आपल्याला सरकारमध्ये राहणे शक्‍य नाही. रेल्वे मंत्रालय आणि त्याचा अर्थसंकल्पही तुम्हीच पाहा, आपण कोलकत्याला जाऊ, असे ममतांनी या मंत्र्यांना सांगितल्याचे समजते.
प्रतिक्रिया
On 11/03/2010 13:26 Amit Bole said:
शेख चे विधान अगदी योग्य आहे . समान नागरिक कायदा बनवा आणि आर्थिक मागासांनाच आरक्षण द्या.
On 3/11/2010 12:47 PM Anand said:
अल्पसंख्यांक - अल्पसंख्यांक हि नाटक आता बास झाली. मुसलमान मुली काय वेगळ्या असतात का हिंदू मुलींपेक्षा? हे 'सेक्युलर' राजकारणी देशाची दुसरी फाळणी झाल्याशिवाय गप्प बसणार नाहीत... यांना फाटकेच दिले पाहिजेत...
On 3/11/2010 12:44 PM shashi said:
सर्व धार्मिक आरक्षण रद्ध करा सर्व
On 3/11/2010 12:38 PM Narayan said:
If women reservation come into existance then 180 seat of Lok Sabha will go to women. and with today's their strength(50)in L.S, they may get another 130 seats resulting male strength will be reduced by around 130 for which no political Parties heart to heart want to pass women reservation bill. Whatever is seen only eye wash for public. Reervation is best medicine for politicians to adopt for their survival in politics. I am very much doubtful whether this bill will be passed in Lok Sabha.
On 3/11/2010 12:35 PM Patrick Gonsalves said:
Amit I 100% agree with you. Mamata dont try to mislead people. there is Reservation and we dont want Reservation in reservation. Its upto you to select woman candidate from any background, it may be hindu/muslim etc. It clear that u are playing political game to have muslim votes in coming elections. if it is so we will teach you a lesson. so dont gamble like Shahrukh otherwise goto Pakistan.
On 3/11/2010 12:28 PM एक माणूस said:
एक लक्षात घ्या पाकिस्तानात पंण ३०% महिला आरक्षण आहे
On 3/11/2010 12:24 PM Nitin said:
कोणालाही महिला आरक्षण नको आहे, त्यांत कॉंग्रेस, भाजप आणि इतर सर्व पक्ष आले.आज पुरुषांच्या कमीतकमी १२० जागा कमी होतील. तेन्हा या पुरुष लोकांनी पुढे काय करायचे. कांही जणांना आत्महत्या करावी लागेल कारण राजकारणी लोक सत्ते शिवाय जिवंत राहू शकत नाही. यांना मुसलमान,दलित आणि मागासवर्गीय यांच्या बद्दल काय प्रेम आहे हे सर्व जगाला माहित आहे. राखीव शब्दा शिवाय हि राजकारणी लोक जिवंत राहू शकत नाही. ममता हिचा त्रास सर्वाना होत आहे. महिला आरक्षण पास झाले तर तिला मग कोण विचारणार. तीच मंत्रिपद काढून घ्या.
On 3/11/2010 12:23 PM prashant said:
महिलांची मते घ्यायला विधेयक ला पाठींबा दिला ....... आता मुस्लिमाची मते घ्यायला मुस्लीम न आरक्षण द्या मानून बोंबा सुरु आहेत हिच्या ..........दुसरे काय ?
On 3/11/2010 12:21 PM Marathi Manus said:
काही जणांना सध्या मराठी भाषेचा फार पुळका आला आहे. स्वत: मराठी मराठी करायचे आणि मुलांना मात्र इंग्रजी शाळेत घालायचे. त्यानंतर मराठीवर भाषणे झोडायची. मराठी कामगारांच्या हक्काबाबत बोलायचे असा सध्या काही लोकांचा उद्योग सुरू आहे, अशा शब्दांत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी, मनसेचे नाव न घेता त्या पक्षांच्या नेत्यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली.
On 11-03-2010 12:05 Amit said:
Mamata dont try to mislead people. there is Reservation and we dont want Reservation in reservation. Its upto you to select woman candidate from any background, it may be hindu/muslim etc. It clear that u are playing political game to have muslim votes in coming elections. if it is so we will teach you a lesson. so dont gamble like Shahrukh otherwise goto Pakistan.
On 3/11/2010 11:39 AM fanofmamta said:
ममता जी तुमचा बंधा रुपया आहे त्या मुले तुमची खूप चीड चीड होत आहे. तुम्ही जरा अनुभव घ्या. मग तुम्ही कुल ह्याल. बाकी त्या मध्ये चा सगळे आहे ते तुम्हाला कळेल मग. घ्या
On 3/11/2010 11:30 AM prashant said:
मतपेट्या भरायासाठी केले reservation , आता बस बोंबलत ........... जोपर्यंत quality ला किमत नाही या देशात तो पर्यंत प्रगती नाही देशाची ..... सगळे reservation काढा .......... आणि दम असेल तर तुमच्या skill वर जिंका ...... फुकट खायची सवय लागली आहे .......... ती जाणे अवघड आहे ....
On 3/11/2010 11:22 AM somnath said:
mamata hai mahilay aahit ka ? deshach vichar kar electincha nako......
On 3/11/2010 10:52 AM You can said:
सगळ्या राजकारण्यांचे म्हणणे आहे कि भारत हे एक प्रगती करणारे राष्ट्र आहे......माझे आजोबा माल सांगायचे कि भारत हे एक प्रगती करणारे राष्ट्र आहे.......माझा वडिलांचे पण म्हणणे अह्हे कि भरात हे एक प्रगती करणारे राष्ट्र अह्हे.......हि अशी प्रगती ? जात पात करतात म्हणूनच प्रगती होत नाही......हिरोशिमा नागासाकी नि १० वर्षात सगळा चेहरा मोहरा बदला......आणि आपल्याला भारत स्वतंत्र होऊन ५० वर्षे पूर्ण झाले......अम्बेद्कारणी घटने मध्ये स्पष्ट लिहिले आहे कि कोणते हि आरक्षण हे स्वतान्त्रानंतर १० वर्षांकरिता असेल..
On 3/11/2010 10:42 AM kunal said:
तरुणांना एक salla plzz jati pati wat bhandu naka ya rajkarni lokana hech have aahe yanich jati pati che padlya aata hech harm khor eka eka jatila vegle karun bhandane lavat ahet ...yanche kay ho desh videshyat bharamsath paisa invest karun thevla aahe but bhartatil janta ithech rahnar ahae so tumhi ek raha ek sangh vha tarch desh tikel aani nakkich aamihi .........jai hind
On 3/11/2010 10:30 AM shreen said:
100%aarkshan deun taka म्हणजे soniya tai ghari bastil
On 3/11/2010 10:27 AM mahesh said:
आर्य काय पगान्ल पंथी खेळ चालू आहेय काय भिक मागत आहेय आरांकाषण साठी काम करा न मेहनत कारण साले आळशी झालेत फुकट मिळत न
On 3/11/2010 10:21 AM Naren Bari said:
३३% बायका आल्या वर ममता बाई ला कोण विचारणार, आणि १ बाई इतके नाटक करते तर ३३% बाय आल्या वर काय होईल, विचार करायला हवा.
On 3/11/2010 10:06 AM एक सच्चा मराठी माणूस..... said:
I strongly agree with shaikh... साला हा तर लोकशाहीचाच अपमान आहे... जर हे सध्याच आरक्षणच भूत लोकांच्या डोक्यातून गेला नाही तर आपल्या भारताचा रशियावेल नाही लागायची... उठा अन् जागे व्हा ...... आपल्या धमन्यात खेळावा................... जय हिंद! जय महाराष्ट्र!!!!!
On 3/11/2010 10:02 AM kishor jagdhane said:
हि सगळी नाटक आहेत. ममता जा पाकिस्तानात. एका महिलेनेच याला विरोध करावा यासारखे दुर्दैव ते काय? kishor jagdhane. bhosari.
On 3/11/2010 9:55 AM Prasad Chaini said:
आपला देश निधर्मी आहे तर जातींवर आधारित कश्याला ? सर्वाना समान संधी द्या , जो कोणी लायकीचा असेल तो फुडे जाईल. या जातीच्या राजकारणाने देश मध्यम युगात आहे का असे वाटते ? आसे फाझील लाड परदेश्यात होत नाहीत.
On 3/11/2010 9:53 AM Ek Punekar said:
मराठी नेत्यांना का नाही असे करायला जमत. सारखी सोनिया च्या मागे शेपटी हलवत हिंडतात... काय मिळाले आपल्याला इतक्या वर्षात... सगळे साले भिकारी आहेत..
On 3/11/2010 9:45 AM sagar said:
Govt should help poors financialy only, but not by reservations.
On 3/11/2010 9:43 AM kunal said:
अगोदरच देशाची वाट लावली जाती जाती पडून आता हेच हरामखोर एकाच जातीविषयी लादतात देश्यासाठी कोणीच नाही साले हरामखोर निवडून आम्ही देयचे आणि हूकमशाही यांची काय चालू आहे भर रस्त्यावर आणून चाप्ल्यानी जोड्याला हवे आता yana politision na bus zale sahan karnyach hi kshamta असते ....जनता हो जागो व्हा आता नाही तर कधीच नाही .......
On 11/03/2010 09:36 OK said:
मुस्लीम राष्ट्र करायचे आहे का "भारताला".... तुझ्या राज्यात काय हैदोस घालायचा आहे तो घाल म्हणावं ममताला...
On 3/11/2010 9:34 AM abhi said:
हिंदुना संपवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे
On 3/11/2010 9:33 AM S A Khan said:
Jevha हिंदुस्तान हे खानिस्तान नावाने ओळखले जाईल Tevach aami gapp basnaar.. Nahitar tumchi watach lavanaar....
On 3/11/2010 9:31 AM Vikas said:
मागास वर्गीयांच्या आरक्षणात देखील ३३ टक्के आरक्षण केल्यास हा प्रश्न सुटेल. तसेच सर्व वर्गातील स्त्रियांना न्याय मिळेल.
On 3/11/2010 9:24 AM CHANDRASHEKHAR DALVI said:
CONGRESS SHOULD GO AHEAD AND PASS THE BILL IN LOKSABHA,WOMAN'S RESERVATION IS WOMAN'S RESERVATION,MAMTA SHOLD NOT SUPPORT ANY RELIGION FOR THIS,ALSO BJP HAS THE GOOD SPEAKERS LIKE SUSHMA,JETLI,GADKARI,THESE PEOPLE SHOULD SUPPORT CONGRESS ON THIS ISSUE.AND YADAV'S ARE ALL USELESS AND BUNCH OF JOKERS,THEY DON'T KNOW HOW TO DEVELOP U.P & BIHAR,FIRST THEY SHULD DO SOME CONSTRUCTIVE WORK IN THESE STATES LIKE NITISHKUMAR.THEN TAILK ABOUT THE WOMAN'S RESERVATION.
On 3/11/2010 9:09 AM suraj said:
आपण reservation हा शब्द भारतीय शबाद्कोशातून काढायला हवा आता.
On 3/11/2010 8:30 AM rb said:
भारतात टोप देशद्रोही कोण ???????????? १) लालू प्रसाद २) मुलायम सिंग ३) अमर सिंग ४) ममता बनर्जी ५) कॉंग्रेस ६) लेफ्ट ७)खानशाही ला प्रोत्साहन देणारे चाटु नेते मंडळी ८) ज्यांच्या मनात पाकिस्तान प्रेम थाचून बहरले आहेत असे नेते आणि फिल्मी मंडळी आणि असे बरेच जे योग्य पद्धतीने देशाचे हिरवेकारण करण्यात पुढे ahet मित्रानो आपला देश काही वर्षांनी हा हिरवा देश होणार आहे. तो दिवस लवकरच येणार आहे जेव्हा हिंदुस्तान हे खानिस्तान नावाने ओळखले जाईल
On 3/11/2010 8:21 AM sudhir said:
मराठीसाठी का कोणे संतापत नाही.
On 3/11/2010 8:11 AM SV said:
तू मार मी रडते..आणि बनवू जनतेला मूर्ख .
On 3/11/2010 7:50 AM Umesh Patil said:
बाई कशाला चिडचिड करते ए होईल कि तुझ्या पण मनासारखे होईल.आहो ह्या भारतात त्यांच्या शिवाय कोण मतदान करत तुम्हाला?? त्यांच्या जीवावर तर सरकार येते तुमचे. नाही तर चांगला माणूस तुमाला मतदान करतो असे वाटते का?बिलकुल नाही.महागाईचे जन्म दाते आहात तुम्ही साले कॉन्गरेसवाले काय आणि तुमी सगळेच सारखेच आहेत.नावात फक्त ममता.............. गद्दार साले लगेच पाठींबा काढायच्या गोष्टी करतात लाज नाही वाटत.काही खेळ समजता तुमी सगळ्या गोष्टींचा.
On 3/11/2010 6:29 AM purushotam said:
Mamta is a chronic blackmailer.Even during NDA days she used this tactic regularly. She should be encouraged to return to Kolkatta permanantly. Always playing difficult is her style.No sympathy is best remedy to get rid of her
On 3/11/2010 5:56 AM shaikh said:
महिला आरक्षण विधेयकातील सध्याच्या तरतुदींना मुस्लिमांचा विरोध आहे. हे वाक्य चुकीचा आहे. मी मुस्लीम आहे आणि माझा महिला आरक्षण विधेयकाला पूर्ण पाठींबा आहे. आणि माझा मुस्लीम आरक्षणआला पण विरोध आहे. सर्व धार्मिक आरक्षण रद्ध करा. Govt should help poors financialy, but not by reservations.
On 3/11/2010 5:05 AM abhi said:
मुस्लीम कोटा की पाहिजे ममता बायीला
On 3/11/2010 2:19 AM Anil Patil said:
जेंह कोन्ग्रेस सरकारने पेट्रोल व इतर वस्तूंची भाव वाढ केली तेन्हा हि ममता काय झोप काढत होती ??
On 3/11/2010 2:09 AM akira said:
reservation in reservation....
On 11/03/2010 01:16 rahul said:
कॉंग्रेस संतापले ; ममता धास्तावली हे कधी होणार ?
On 3/11/2010 12:58 AM vijay said:
मुस्लीम इंडिअन इस गोइंग तो हप्पेन.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: