|
|
|
|
|
|
शरीरात वाहणारा चैतन्यप्रवाह, तारुण्य व सिद्धी म्हणजेच संपूर्ण आयुर्वेदाने वर्णन केलेले "आरोग्य... तनाचे व मनाचे.' ही अवस्था मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे "ध्यान'. येणारा गुढी पाडवा "सोम' ध्यान पद्धतीचा अवलंब करून सुरवात करण्यासाठी उत्तम दिवस समजावा आणि खरा गुढी पाडवा म्हणजे कुंडलिनी जागृती किंवा मेरुदंडाची गुढी उभी राहून वर ठेवलेला मस्तकरूपी घडा चैतन्याने भरून आनंदाचा अनुभव घ्यावा.
Friday, March 12, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आतील ॐकार म्हणून आपल्याला आजाराचे निवारण करणे, हा आपला पहिला हेतू आहे. ॐकार म्हणण्याच्या ऱ्हस्व, दीर्घ व प्लुत या तीन पद्धती महत्त्वाच्या असतात. ऱ्हस्व ॐकार कफदोषावर, तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यासाठी उपयोगी असतो. वैश्वानर अग्नी म्हणजेच शरीराची हार्मोनल सिस्टीम नीट चालत नाही त्यांच्यासाठी ऱ्हस्व व दीर्घ ॐकार अत्यंत उपयोगी असतो.
Friday, March 12, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
दूध आणि दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांसारखेच दुधावर संस्कार करून तयार केले जाणारे पदार्थही पौष्टिक असतात. मात्र खवा, खरवस खाताना जरा जपून... दुधापासून तयार होणाऱ्या दही, ताक, लोणी, तूप या मुख्य पदार्थांचे गुणधर्म आपण पाहिले. आता आपण दुधावर संस्कार करून तयार होणाऱ्या साय, खरवस, पनीर, खवा, चक्का वगैरे पदार्थांची माहिती घेणार आहोत. दुधाची साय दुधाला उकळी आल्यानंतर ते थंड झाले की दुधावर तयार होणारा स्निग्ध थर म्हणजे साय.
Friday, March 12, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आपल्याजवळ असणाऱ्या कोणत्याही गोष्टीला आपण आता मुकतो आहोत ही भावना चिंता निर्माण करते. ती गोष्ट गमावल्यावर वाईट वाटते. खिन्नता ही वाईट वाटण्याचीच तीव्र आणि दीर्घकाळ टिकून राहणारी स्थिती असते. खिन्नतेमध्ये वाईट वाटण्याच्या जोडीला थकवा, निरुत्साह, आता आपल्याला कोणीही मदत करू शकणार नाही आणि भवितव्यात काही बरे होण्याची आशा नाही, असेही वाटत राहते. चेहऱ्यावर खिन्नतेचा भाव उमटतो. आवाज खोल जातो. उठणे, बसणे, चालणे संथ होते.
Friday, March 12, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
ताकाचे गुणधर्म दर तासाला बदलतात असे ऐकले होते. हे खरे आहे का? असल्यास काय बदल होतात? ...श्री दिलीप बोकील उत्तर - ताकाचे गुणधर्म दर तासाला बदलत नाहीत. आयुर्वेदाच्या ग्रंथात ताजे ताक व आंबट, शिळे ताक यांचे वेगवेगळे गुणधर्म दिलेले आहेत. रात्री विरजण लावलेल्या दुधाचे सकाळी नीट दही लागले की जे ताक तयार होते ते ताजे ताक. हे ताजे ताक त्याच दिवशी दुपारच्या जेवणात पिणे उत्तम असते. पण आज बनविलेले ताक दुसऱ्या दिवशी प्यायल्यास ते शिळे होय.
Friday, March 12, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
निसर्गाच्या असंतुलनामुळे स्त्रीचा एकंदरीत अग्नी (हार्मोनल सिस्टीम) दूषित होऊन स्त्रीला नाना तऱ्हेच्या यातना भोगाव्या लागत आहेत. एकूणच स्त्रीला सुखासाठी वा तिच्या स्त्रीत्वाचा स्वीकार होण्यासाठी बाह्य सौंदर्याचा आधार घेणे आवश्यक आहे, अशा भ्रामक समजुतीमुळेसुद्धा स्त्रीच्या आरोग्यासाठी केवळ वरवरचे व कामचलाऊ उपाय अवलंबण्यात आलेले दिसतात. स्त्रीचे आरोग्य खराब झाल्यास भावी पिढीच्या आरोग्यावरही दुष्परिणाम दिसतील.
Thursday, March 04, 2010 AT 10:38 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अतिश्रमानंतर थकवा येणे निसर्गक्रमप्राप्त आहे. थकवा येणे हे लक्षण नेहमी आढळते. ते टिकले तर त्याचे कारण शोधले गेले पाहिजे. तथापि क्षुल्लक हालचालीनंतर थकणे हे लक्षण अनेक शारीरिक आणि मानसिक विकारात आढळते. सामान्यपणे रात्रभर झोपून सकाळी उठल्यावर येणारा थकवा हा मानसिक कारणांनी होतो परंतु दरवेळेस तसेच असेल असे मात्र नाही.
Thursday, March 04, 2010 AT 10:28 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
तूप गुणांनी सर्वश्रेष्ठ आहे. शरीराला उचित स्निग्धता देणारा सर्वांत श्रेष्ठ पदार्थ. पंचकर्म करताना औषधांनी संस्कारित केलेले तूप प्यायल्याने शरीरातील विषद्रव्ये सुटी होतात. दुधापासून बनवल्या जाणाऱ्या सर्व पदार्थांपैकी तूप सर्वोत्तम असते. कारण ते गुणांनी सर्वश्रेष्ठ असते आणि दीर्घकाळ टिकणारेही असते. वास्तविक तूप योग्य प्रकारे तयार केले की कधीच खराब होत नाही. जुने तूप जखमा भरून आणण्यासाठी वापरता येते.
Thursday, March 04, 2010 AT 10:32 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
स्त्री-शक्तीकडे सुरवातीपासून लक्ष दिले, प्रकृतीनुरूप आहार, व्यायाम यांची योजना केली, रस-रक्त व हाडे यांची ताकद वाढवणारी रसायने सेवन केली तर स्त्री-शक्ती व्यवस्थित राहील. त्यामुळे केवळ स्त्री-आरोग्यच नाही, तर समस्त मानवजातीचे आरोग्य सुधारेल. "शक्ती' हा शब्द "ताकद' या अर्थाने वापरला जातो, तसेच देवीलाही शक्तीचे रूप समजले जाते. स्त्रीचे स्त्रीत्व ही स्त्रीची शक्तीच असते.
Thursday, March 04, 2010 AT 10:36 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मी ऑस्ट्रेलियात राहते. येथे ताजे, प्रोसेस न केलेले दूध मिळत नाही. त्यामुळे घरचे लोणी, तूप वगैरे तयार करता येत नाही. अशा वेळी काय करावे? मला ऍलर्जिक सर्दीचाही खूप त्रास होतो. सर्दी ना धड बाहेर पडते, न बरी होते. श्वास घ्यायलाही त्रास होतो. इथले डॉक्टर प्रत्येक वेळी फक्त स्प्रे देतात. पण त्यामुळे पूर्ण बरे वाटत नाही. काय करावे?...श्रीमती अमेडी, ऑस्ट्रेलिया उत्तर - ताजे दूध मिळाले नाही तरी फक्त पाश्चराईझ केलेले दूध मिळते का याची चौकशी करावी.
Thursday, March 04, 2010 AT 10:21 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
प्राण वर घेऊन जाण्यासाठी, प्राण मूर्ध्नास्थानी नेण्यासाठी नाकपुड्या दाबून बसण्याचा अभ्यास किती दिवस करणार? त्यापेक्षा ॐ इति एकाक्षरं ब्रह्म व्याहरन्, याची सुरवात करा. ॐ ला एकाक्षर ब्रह्म का म्हटले? कारण सर्व ब्रह्माचे मूळ नादात आहे व हा नाद ॐ आहे.
Friday, February 26, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
काळजी वाटणे हे स्वाभाविक आहे. निरामय मनात आलेल्या काळजीचा उपयोग करून अनेक संकटांचा मुकाबला करता येतो. याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे ज्याची काळजी वाटते आहे त्यासंबंधी नेमके काय करावयाचे, हे ठरवून त्याप्रमाणे कार्यवाही लगेच सुरू करणे. योग्य प्रमाणात काळजी वाटणे आवश्यक असते. अशी भावना उपयुक्त असते. याला यू-स्ट्रेस (Eustress) म्हणतात. आपली शारीरिक व मानसिक कार्यक्षमता अशा योग्य प्रमाणातील काळजीमुळे वाढते. याला काळजी घेणे असे आपण म्हणतो.
Friday, February 26, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
रोगापासून दूर राहायचे असेल, झालेल्या रोगापासून मुक्त व्हायचे असेल, जीवन संपन्न करायचे असेल, स्वतःबरोबर निसर्गाचेही संतुलन साधण्यासाठी प्रयत्न करायचे असतील, तर त्यासाठी ध्यान हा सर्वोत्तम उपाय होय. रोगनिवारण म्हणजे रोगाचा मुळापासून नायनाट करणे. अर्थातच यात केवळ त्रास दूर होणे अपेक्षित नसते, तर रोगाच्या कारणांवर काम होणे आवश्यक असते.
Friday, February 26, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
योग्य स्वरूपात व योग्य प्रमाणात वंगण अर्थात स्निग्धता, ही शरीराची महत्त्वाची आवश्यकता असते. शरीरालाच नाही, तर निर्जीव यंत्राला, वाहनालाही नुसती वीज वा पेट्रोल, डिझेल पुरत नाही, बरोबरीने वंगण लागतेच. शरीरासाठी सर्वोत्तम वंगण म्हणजे साजूक, आयुर्वेदीय पद्धतीने बनविलेले तूप. वेदकाळापासून तुपाला खूप महत्त्वाचे समजले जाते. यज्ञ-याग, पूजा-अर्चा वगैरेंसाठी तूप लागतेच पण औषध म्हणून, आहारद्रव्य म्हणूनही ते सर्वश्रेष्ठ असते.
Friday, February 26, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
माझा मोठा मुलगा 4 वर्षांचा आहे. त्याला भूक लागत नाही व त्याचे वजनही वाढत नाही. त्याला पंचामृत, चैतन्य कल्प वगैरे औषधे दिली तर चालतील का? ती कशी द्यायची? आपल्या गर्भसंस्कार पुस्तकात लहान मुलांच्या संगोपनाविषयी माहिती आहे का? कृपया मार्गदर्शन करावे. ...सौ. कांचन पाटील उत्तर  : बाळ सहा महिन्यांनंतर आईच्या दुधाखेरीज इतर अन्न खायला सुरवात करते, तेव्हापासून त्याला पंचामृत, चैतन्य कल्प वगैरे गोष्टी देता येतात. सध्या तुमचा मुलगा 4 वर्षांचा आहे.
Friday, February 26, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
गेल्या दोन दशकांमध्ये चरबी कमी करण्याबद्दलचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यालाच "लायपोसक्शन' म्हणतात. यामध्ये चरबी कायमची कमी करता येते व शरीरालापण सुडौल बनवता येते. समाजात वावरताना स्वाभिमानाने, आत्मविश्वासाने वागता येते. सुडौल व तंदुरुस्त शरीर हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. नियमित व्यायाम करूनही काही व्यक्तींमध्ये जास्त चरबी असते. ती कुठेही असू शकते, तर काही विशिष्ट ठिकाणीही असू शकते.
Friday, February 26, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
डॉ. श्री बालाजी तांबे मेंदूने शरीर चालवायच्या संकल्पनेला (प्रोग्रामला) इंद्र म्हटलेले आहे. मेंदूतल्या वेगवेगळ्या सर्व शक्तिकेंद्रांना म्हणजे देवतांना सोमरसाची आवश्यकता असते. या मेंदूतल्या सोमरसावर आपल्याला प्राण आकर्षित करता आला, तर तो प्राण सर्व शरीरभर पसरवणे खूप सोपे होते. या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. ध्यानाने रोग बरे कसे व का होऊ शकतात? रोग बरा करण्यासाठी आपल्या हातात काय असते व रोग कशामुळे बरा होईल हे पाहणे आवश्यक आहे.
Friday, February 19, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
डॉ. श्री बालाजी तांबे लोण्याच्या सेवनामुळे कोलेस्टेरॉल वाढेल, हृदयरोग होईल, वजन वाढेल अशी भीती बऱ्याच वेळा जनसामान्यांमध्ये दिसते मात्र घरी बनविलेले ताजे लोणी योग्य प्रमाणात खाण्यामुळे कोणताही त्रास होत नाही, हा अनुभव आहे. शिळे किंवा महिनोन् महिने टिकणारे बाजारचे तयार लोणी खाण्याने कफ वाढून मेद वाढू शकतो. घरच्या ताज्या लोण्याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होणे शक्य नसते. ताक बनविताना जो स्निग्ध पदार्थ तयार होतो, ते म्हणजे लोणी.
Friday, February 19, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आयुर्वेदिक औषधे घेतल्यानंतर बरे वाटले, तरी हा फरक किती दिवस राहतो का वारंवार औषधे घ्यावी लागतात तसेच दीर्घकाळ औषधे घेण्याचा इतर काही परिणाम होऊ शकतो का? - श्री. देशमुख, पुणे उत्तर  - रोग काय आहे, कशामुळे झाला आहे, किती दिवसांपासून आहे, आनुवंशिक वगैरे आहे का या सर्व गोष्टींवर बरे वाटणे अवलंबून असते. आयुर्वेदिक उपचार शरीरातील असंतुलन दूर करून, शरीरशक्ती वाढवून रोग बरा करण्याचे काम करत असतात.
Friday, February 19, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
डॉ. श्री बालाजी तांबे आयुर्वेदात चमत्कृतीयुक्त योग सांगितलेले असले, तरी ते सिद्ध होण्यासाठी मनाची शुद्धी असणे खूप आवश्यक असते. एवढे दीर्घायुष्य मिळविण्याचा उद्देशही तपस्या, ध्यान वगैरेंचा अभ्यास करणे, असा असावा लागतो. स्वार्थ मनात ठेवून किंवा वाईट ध्येय असल्यास या प्रकारचे रसायन फळत नाहीत. ध्यान हे आरोग्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असतेच पण ते योग्य प्रकारे होण्यासाठी मार्गदर्शनाची, गुरूंची खूप आवश्यकता असते.
Friday, February 19, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
डॉ. ह. वि. सरदेसाई साचविलेल्या अनुभवाची पुनःपुन्हा पुनरावृत्ती करण्याने साठवणे टिकते व पुनरावृत्ती सहज होते. असे केले गेले नाही, तर पुनरावृत्ती कठीण होते. जी गोष्ट आपल्याला आठवणे आवश्यक आहे तिचे स्मरण रोज करणेच इष्ट. आलेला अनुभव साचविणे आणि त्याची पुन्हा जाणीव करता येणे असे स्मृतीचे स्वरूप असते. अनुभवाची आठवण न होणे म्हणजे विस्मृती, विसरणे. अनुभव आपल्या ज्ञानेंद्रियांतून मेंदूकडे जातात.
Friday, February 19, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
काट्यांचा सहवास असला तरी मनुष्याने इतरांना सुगंध द्यावा, वृत्ती शांत व प्रफुल्लित करायला मदत करावी, हा संदेश गुलाबाचे झाड देते. "व्हॅलेंटाइन डे' येत आहे. मग गुलाबाचे फूल तयार ठेवले का? इतर सर्व भेटवस्तू वगैरे देण्याचे प्रयोजन व फायदा फक्त व्यापाऱ्यांपुरता. हा सण भारतीय आहे की नाही हा विषय बाजूला ठेवला, तरी गुलाब देऊन प्रेम वाढविण्याची सध्या तरी खूप आवश्यकता आहे. एखाद्या आजारी व्यक्तीची तब्येत पाहायला जाताना गुलाबाच्या फुलाची हमखास आठवण होते.
Friday, February 12, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
वातदोषावर किंचित आंबट ताक सैंधवासह घेणे चांगले असते. पित्तविकार असता गोड ताक साखरेसह घेणे आणि कफविकारावर सुंठ, मिरी, पिंपळी व यवक्षार यांचे चूर्ण घालून ताक घेणे उत्तम असते. योग्य पद्धतीने बनविलेले व योग्य प्रक्षेपद्रव्यांसह घेतलेले ताक तिन्ही दोषांसाठी पथ्यकर असते. दूधापासून तयार होणाऱ्या पदार्थांत ताक अतिशय पथ्यकर असते. दुपारच्या जेवणानंतर वाटीभर ताक पिणे, हे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम मानले जाते.
Friday, February 12, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
गुलाबाचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी सुगंधी गुलाब हवा. वास न येणारे गुलाब बरेच दिवस टिकत असले, दिसायला चांगले दिसत असले, तरी गुलाबाची खरी किमया, गुलाबाची खरी उपयुक्तता त्याच्या सुगंधात व कोमलतेमध्ये आहे. अशा खऱ्या व सुगंधी गुलाबाचा दैनंदिन जीवनात निरनिराळ्या पद्धतीने उपयोग केला, तर जीवन सुगंधित व प्रसन्न बनेल हे नक्की. जगभरात मानाचे स्थान असणारे फूल म्हणजे गुलाब.
Friday, February 12, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
परीक्षा तोंडावर आल्या आहेत आणि उत्तम रीतीने उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी वर्ग अगदी जोरात तयारीला लागला आहे. आपल्या पाल्यांच्या परीक्षा म्हणजे त्या संपेपर्यंत पालकांनाच ताण असतो. आपले मूल एकाग्रतेने अभ्यास करते आहे ना, पेपर लिहिताना आपले मूल केलेला अभ्यास विसरणार तर नाही ना, एक ना अनेक. असे ऐन परीक्षेत होणारे मुलांचे गोंधळ तुम्ही होमिओपॅथी किंवा पुष्पौषधीने जरूर कमी करू शकता.
Friday, February 12, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
माझा मुलगा अडीच वर्षांचा असून त्याला सर्दीचा कायम त्रास होतो. वारंवार तापही येतो. ऍलर्जी टेस्टमध्ये बेकरी उत्पादने, हरबरा डाळ, टोमॅटो व बटाट्याची ऍलर्जी असल्याचे समजले. तसेच त्याचे शब्दोच्चारही स्पष्ट नाहीत. कृपया त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी काही उपाय सांगावा. ...सौ. सावंत उत्तर ः लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी केशर, सुवर्णवर्खयुक्त "बालामृता'सारखे रसायन उत्तम असते. चिमूटभर बालामृत रोज मधासह घेण्याने सर्दी, तापास प्रतिबंध होईल.
Friday, February 12, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आपल्याला केवळ दमछाक करणारी आणि सरतेशेवटी आजारी पाडणारी गती नको तर आरोग्य, निरामयता, शांतता, सुख व समृद्धी देईल अशी गती हवी आहे. यासाठी ध्यानमार्गाचे आचरण करावे, असे आपल्याला भगवंतांनी, वेदवाङ्मयाने व परंपरेने सांगितले आहे. आपल्यावरचे ताण दूर करून शांती मिळवायची असेल, तर "सोम साधना' करणे आवश्यक ठरते. आरोग्यासाठी, रोगनिवारणासाठी साधारणपणे आपण आहार, व्यायाम, औषधे वगैरे निरनिराळे प्रयत्न करत असतो.
Friday, February 05, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
चुकीच्या विचारसरणीवर आधारलेला अढळ विश्वास म्हणजे वैचारिक भ्रम. अशी "भ्रमिष्ट' माणसे स्वतःहून उपचारांसाठी येत नाहीत. त्यांच्या नातेवाइकांना किंवा आप्तेष्टांना रुग्णाच्या आचारा-विचारात पडलेला फरक समजला तर ही माणसे रुग्णाला उपचारासाठी आणतात. असे भ्रम शारीरिक अथवा मानसिक कारणांनी पडू शकतात. आपले शिक्षण, आपल्यावर झालेले संस्कार आणि आपली सामाजिक-कौटुंबिक जडणघडण यावर आपल्या विचारसरणीतील सुसूत्रता अवलंबून असते.
Friday, February 05, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जन्मानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये बाळाचा विकास सर्वस्वी दुधावरच होत असतो. अर्थातच आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम असते. दुधाला पूर्णान्न समजले जाते, कारण जन्मानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये बाळाचा विकास सर्वस्वी दुधावरच होत असतो. अर्थातच आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम असते. काही कारणास्तव आईचे दूध न मिळाल्यास गाईचे वा बकरीचे दूध बाळाला देता येते. आयुर्वेदात आठ प्राण्यांच्या दुधाचे स्वतंत्र गुण सांगितले आहेत.
Friday, February 05, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
शरीरांतर्गत अवयवांचे कार्य व मन - इंद्रिय यांचे कार्य मेंदूकडून नियंत्रित केली जातात. ही दोन्ही कार्ये वेगवेगळी असली तरी त्यांच्यात सुसूत्रता व सुबद्धता असणे महत्त्वाचे असते. या दोघांमधली सुसूत्रता नष्ट झाली की घडतो प्रज्ञापराध. तो अनेक शारीरिक, मानसिक रोगांना कारण ठरू शकतो. हे टाळण्यासाठी ध्यान खूप महत्त्वाचे असते. भारतीय संस्कृतीला अनेक शास्त्रांचे वरदान मिळालेले आहे.
Friday, February 05, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मी दिवसातून आठ - नऊ तास संगणकावर काम करतो. त्यामुळे डोळ्यातून पाणी येणे, डोळे चुरचुरणे, पापण्या फडफडणे असा त्रास होतो. तरी यावर काय उपाय करावा याबद्दल मार्गदर्शन करावे....श्री. समीर माळी, हडपसर उत्तर - संगणकावर बरेच काम करणाऱ्यांना सहसा या प्रकारचा डोळ्यांचा त्रास कधी ना कधी होतोच. भविष्यात त्रास होऊ नये व होत असलेला त्रास दूर करण्यासाठी डोळ्यात अंजन घालण्याचा उपयोग होताना दिसतो. पुरुषांनाही घालता यावे यासाठी खास रंगविरहित अंजन मिळू शकते.
Friday, February 05, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|