Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font


कोकण
प्रशांत हिंदळेकर - सकाळ वृत्तसेवा मालवण- तालुक्‍यात पर्यटनाचा हंगाम फुलला आहे मात्र याच्याच जोडीला खवैय्यांची संख्या वाढल्याने मासळीच्या किमतीत चौपटीने वाढ झाली आहे. मासे कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने मुंबईतून मासे मागविण्याची वेळ येथील व्यावसायिकांवर आली आहे. उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी तालुका गजबजून गेला आहे. ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला व तारकर्ली पर्यटनस्थळास पर्यटकांची जास्त पसंती आहे.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

रत्नागिरी- रत्नागिरी शहर प्लास्टिक मुक्‍त मोहिमेची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे. आतापर्यंत पालिकेने पंधरा ते वीस किलो पिशव्या जप्त केल्या आहेत. भविष्यात प्लास्टिक पिशव्या आढळल्यास व्यापाऱ्यांना पाच हजार रुपये दंड ठोठावण्याची कारवाई पालिकेकडून केली जाणार आहे. दंडात्मक कारवाईपेक्षाही शहरातील व्यावसायिकांनी स्वतःहून प्लास्टिक पिशवी वापर थांबवल्याने पालिकेला प्लास्टिक मुक्‍तीचे अर्धे यश गवसले आहे.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

रत्नागिरी- रत्नागिरीचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्याकडे जाणारा मार्ग सध्या अत्यंत बिकट झाला आहे. पर्यटकांचा वाढता ओघ असलेल्या या रस्त्याची रुंदी वाढवावी आणि रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे. रत्नागिरी येणाऱ्या पर्यटकांना रत्नदुर्ग किल्ला, मांडवी, भाट्ये समुद्रकिनारा, थिबा राजवाडा अशा जागांचे आकर्षण असते. संपूर्ण राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात गर्दी करतात.

Thursday, May 17, 2012 AT 12:45 AM (IST)

पर्यटन विकसित सुविधा दुर्लक्षित गणपतीपुळे- रात्रीच्या अंधारात लख्ख प्रकाश पसरावा, यासाठी येथील मोरया चौकात आणि समुद्र चौपाटीवर हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत मात्र ते बंद आहेत. समुद्र चौपाटीवरील शहाळी विक्रेत्यांसाठी किनाऱ्यावरील सुरूबनात व्यापारी संकुल (गाळे) बांधण्यात आले आहेत पण त्या ठिकाणी अद्याप व्यापारी पोहोचले नसल्यामुळे गाळे तसेच पडून आहेत.

Thursday, May 17, 2012 AT 12:45 AM (IST)

नागेश पाटील ः सकाळ वृत्तसेवा चिपळूण- जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे रूपडे बदलण्यासाठी पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या निधीतून पालिकेने दीड कोटीच्या खर्चाचा प्रस्ताव प्रधान सचिव कार्यालयाकडे पाठविला आहे. त्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर सांस्कृतिक केंद्राचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. चिपळूणचे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र हे कोकणातील पहिले बंदिस्त नाट्यगृह आहे.

Thursday, May 17, 2012 AT 12:45 AM (IST)

रत्नागिरी- "प्रत्येक चित्रपट हिट होत नाही, आयपीएलचे सगळे सामने कुणी पाहतील असे नाही. आज प्रेक्षकांकडे चॉईस आहे. त्यामुळे ते रिमोट हातात पकडून आवडेल ते चॅनेल पाहतात. मालिकांचा प्रेक्षक वर्ग हा वेगळा आहे. त्यामुळे मालिकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येही गेल्यानंतर आम्हाला दिसत आहे,'' अशी प्रतिक्रिया अभिनेता संजीव शेठ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली.

Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)

राजेंद्र बाईत - सकाळ वृत्तसेवा राजापूर- महाराष्ट्रासह परराज्यात प्रसिद्धी पावलेल्या राजापूरच्या गंगेने भाविकांना शारीरिक, मानसिक सौख्य मिळतेच पण अनेकांना तात्पुरत्या स्वरूपात चांगला रोजगारही मिळत आहे. सर्वसाधारणपणे तीन वर्षांनी आगमन होणाऱ्या गंगामाईचे यावेळी वर्षभरातच पुन्हा आगमन झाल्याने साऱ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला मात्र स्थानिकांसाठी तो सुखद ठरला आहे. निर्जन असलेल्या या भागात गंगा नसते, तेव्हा शुकशुकाट असतो.

Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)

रत्नागिरी- खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 15 जूनपूर्वी आवश्‍यक असलेली खते उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी दिल्या आहेत. जिल्ह्याच्या 2012-13 च्या खरीप व रब्बी हंगाम नियोजनाची बैठक श्री. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब जगताप, कोकण विभागाचे कृषी उपसंचालक विजयकुमार इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, नारळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ.

Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)

रत्नागिरी- शहर आणि परिसरात झोपडपट्टीतील लहान मुले प्लास्टिक, बाटल्या, कचरा गोळा करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या मुलांना शैक्षणिक प्रवाहात सामील करून घेणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दोन वर्षांपूर्वी 300 मुलांना पालिकेने शाळेच्या प्रवाहात आणले होते मात्र आजही अनेक मुले कचरा गोळा करत आहेत. अनेक वर्षांपूर्वी मिरकवाडा बंदराच्या बांधणीसाठी परराज्यातून आलेले अनेक कामगार झोपड्या बांधून रत्नागिरीकर झाले. शहरात सुमारे 740 झोपड्याधारक आहेत.

Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)

कणकवली- पालकमंत्री नारायण राणे यांचे मूळ गाव असलेल्या वरवडेतील तीन वाड्यांत सध्या पाणीटंचाई आहे. या गावासाठी 50 लाखांचा आराखडा असलेला जलस्वराज्य प्रकल्प गेली चार वर्षे रखडला आहे. याबाबत चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही. वरवडेतील वरची मुस्लिमवाडी, खालची मुस्लिमवाडी आणि देसाईवाडी यासाठी 50 लाख खर्चाचा जलस्वराज्य प्रकल्प मंजूर झाला.

Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)

रत्नागिरी- महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (एमसीआयएम) आणि नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिशनच्या (एनआयएमए) रत्नागिरी शाखेच्या संयुक्त विद्यमाने येत्या 10 जूनला रत्नागिरीत डॉक्‍टरांसाठी निरंतर वैद्यकीय शिक्षणाचे (सीएमई) आयोजन केले आहे. अशा तऱ्हेची राज्यव्यापी कार्यशाळा रत्नागिरीत प्रथमच होणार आहे. येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी पूर्णवेळ उपस्थित राहणाऱ्या डॉक्‍टरांना एमसीआयएमकडून 10 गुण देण्यात येणार आहेत.

Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)

सिंधुदुर्गनगरी- जिल्हा परिषदेची पहिलीच स्थायी समिती सभा उद्या (ता. 17) होणार आहे. जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईवरून उठलेल्या वादळावर या सभेत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्ष निकिता परब यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे. विषय समिती निवडीनंतर प्रथमच होत असलेल्या या महत्त्वाच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या जिल्ह्यात पाणीटंचाईचा विषय अत्यंत गंभीर बनला आहे.

Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)

वैभववाडी- जिल्हा प्रशासनाच्या ढीम्म कारभारामुळे जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या कारभाराविरोधात आचारसंहिता, जमावबंदी झुगारून भाजपा आंदोलन छेडणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली. येथील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी आमदार संजय केळकर, तालुकाध्यक्ष प्रमोद रावराणे, उत्तम सुतार, सुहास सावंत, गजानन पाटील, अभिजीत पवार आदी उपस्थित होते. श्री.

Thursday, May 17, 2012 AT 12:00 AM (IST)

सावंतवाडी- येथील एसटीस्थानकावर आज सकाळी पोलिसांना भेदरलेल्या स्थितीतील एक अल्पवयीन मुलगी दिसली. मूळ चंदगड-माणगाव येथील ही मुलगी गोव्याला जात होती. तिची रवानगी पोलिसांनी निवारा केंद्रात केली. संबंधित मुलीच्या आईला येथील पोलिस ठाण्यात बोलवून घेतले जाईल.

Thursday, May 17, 2012 AT 12:00 AM (IST)

मालवण- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष सुधीर मांजरेकर इच्छुक होते मात्र बैठकीस उपस्थित सदस्यांनी राजेंद्र गावकर यांच्या नावास पसंती दिल्याने श्री. मांजरेकर यांनी नाराज होत माघार घेतली. त्यामुळे पक्ष निरीक्षक बबन साळगावकर यांनी तालुकाध्यक्ष म्हणून राजेंद्र गावकर यांची निवड जाहीर केली. राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष निवडीसाठी आज सायंकाळी कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे बैठक झाली.

Thursday, May 17, 2012 AT 12:00 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: