|
मुंबई -  नेपोलियनवर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत मात्र शिवरायांच्या आयुष्यावर उणीपुरी 50 हजार पाने लिहिली गेली नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज येथे व्यक्त केली. शिवरायांचे चरित्र जनतेसमोर ठेवण्यासाठी एक जन्म अपुरा आहे. त्यामुळे देवाने आपल्याला पुढील तीन-चार जन्म शिवचरित्र लिहिण्यासाठी द्यावेत, असे साकडे त्यांनी देवाला घातले. 'स्टार प्रवाह' या लोकप्रिय वाहिनीवरील "राजा शिवछत्रपती' या मालिकेच्या डीव्हीडी प्रकाशनचा सोहळा वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. शिवशाहीर पुरंदरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते डीव्हीडी प्रकाशित करण्यात आल्या. अर्थमंत्री सुनील तटकरे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी महाराज, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर, राजकुमार हिरानी, केतन मेहता, "गांधी माय फादर' चित्रपटाचे निर्माते फिरोज खान आदी व्यासपीठावर होते. श्री. पुरंदरे म्हणाले, 'शिवाजी महाराजांचे कार्य खूप मोठे आहे. आपल्याला अजूनही शिवचरित्राचा अभ्यास करायचा आहे.
Friday, June 25, 2010 AT 09:50 AM (IST)
|