|
नागपूर -  जनजागृती वाढू लागल्याने आरोग्य विमा काढणाऱ्यांचे प्रमाण नागपूर विभागात दरवर्षी सरासरी 15 ते 20 टक्क्यांनी वाढत असून, सध्या 30 टक्के नागरिकांकडे आरोग्य विमा असल्याची माहिती आहे. धावपळीच्या युगात तरुण वयात युवकांना विविध आजार होऊ लागले असल्याने आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विमा काढण्यात येत आहे. तसेच विमा कंपन्यांनी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सामान्य विमा आणि आयुर्विमा असे दोन प्रकार आरोग्य विम्यात आहेत. त्यात सामान्य विमा काढणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, ओरिएन्टल इन्शुरन्स आणि नॅशनल इन्शुरन्स या चार कंपन्या सामान्य विमा काढतात. आयुर्विमामध्ये आयुर्विमा महामंडळ, रिलायन्स इन्शुरन्स, एचडीएफसी स्टॅन्डर्ड लाईफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय प्रुडेंशियल, कोटक महिंद्रा, टाटा एआयजी, बिर्ला आणि बजाज अलायन्ससह 10 ते 12 कंपन्यांचा समावेश आहे. सामान्य विम्यामध्ये विमाधारकाला झालेल्या संपूर्ण खर्चाचा परतावा मिळतो. कमीतकमी एका लाखाचा विमा असल्यास विम्याच्या एक टक्का रक्कम ही विमाधारकाला रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मिळते.
Thursday, September 09, 2010 AT 09:30 AM (IST)
|